कळंबा तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू |
*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूर : मित्राबरोबर पोहायला गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा कळंबा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनिरुद्ध संभाजी घाटगे (वय वर्षे २१ रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
घटना घडल्यानंतर त्याच्या मित्रानी लगेच पोलिसांशी संपर्क साधून करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व बीट अंमलदार आपल्या सहकाऱ्यांसह कळंबा तलावावर पोहोचले. त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व अग्नि शामक दलाला बोलावून घेतले. या दलाने जवळपास ५ तास शोध मोहीम राबविल्यानंतर मृतदेह तलावाच्या पश्चिम भागातील पात्रात सापडला.
अधिकृत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिरुद्ध सकाळी ११.३०च्या दरम्यान मित्राबरोबर पोहायला गेला होता. कळंबा तलावाच्या मध्यभागापर्यंत पोहोचत गेले. मात्र मागे फिरत असताना पोहताना अचानक दम लागल्याने अनिरुद्ध घाटगे पाण्यात बुडू लागला. जीवाच्या आकांताने त्याने पुढे पोहत गेलेल्या मित्रांना बाहेर काढण्यासाठी इशारा केला मात्र मित्राने शर्थीचे प्रयत्न करून ही त्याला वाचू शकले नाहीत. कारण तलावातील गाळ काढल्याने पात्र खोलगट बनले होते.
या घटनेची माहिती कळताच कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. उपस्थित असणाऱ्या बघ्यांनी हळहळ व्यक्त केली. अनिरुद्धच्या मागे आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
या घटनेने सर्व परिसरात शोककळा पसरली आहे. जगात आहे या ठिकाणी बघायची प्रचंड गर्दी झाली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा