Breaking

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

तांत्रिक कारणास्तव देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा यशस्वीपणे सुरू व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद : मा.गजानन पळसे, प्र.संचालक


मा. गजानन पळसे,प्र.संचालक

प्रा.अक्षय माने  :कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


     शिवाजी विद्यापीठाच्या मार्च/ एप्रिल २०२१ परीक्षा दि.१० ऑगस्ट २०२१ पासून ऑनलाईन पध्दतीने सुरळीतपणे सुरु झाल्या आहेत.मात्र काही तांत्रिक कारणास्तव विद्यापीठाच्या परीक्षा न देवू शकलेल्या विद्यार्थ्यासाठी त्याची पुनर्परीक्षा दि. १६ सप्टेंबर २०२१ पासून सुरु झाल्या होत्या. आज दि. २२ सप्टेंबर २०२१ रोजी बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. एम.ए. एम.कॉम. एम.एस्सी. आदी अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या आहेत.

    आजच्या पुनर्परीक्षेसाठी ११५१ विद्यार्थ्यांपैकी ९०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवू नये यासाठी तांत्रिक अडचणीचे निराकरण करणेसाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सॉफ्टवेअर पुरवठादार कंपनीची यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती.    

      आज दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी खालील एकूण २० परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले व आजपर्यंत एकूण २८९ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल  घोषित करण्यात आले आहेत.

       तसेच अद्याप ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झालेली नाही त्यांनी मॉक टेस्ट सत्वर द्यावी म्हणजे मुख्य परीक्षेत

तांत्रिक अडचणी येणार नाही असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री गजानन पळसे यानी महाविद्यालयास केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा