कोल्हापूर : राज्यातील 21 जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्ह दर हा पाच टक्क्यांहून कमी असताना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. कोल्हापुरचा कोरोना पॉझिटिव्ह दर हा 11 टक्के, सांगलीचा 10 टक्के तर साताऱ्याचा 9.75 टक्के इतका आहे. कोल्हापुरचा विचार केला तर गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची रोजची आकडेवारी ही 1500 ते 2200 पर्यंत वाढत आहे.
कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यासाठी निर्बंधांचे पालन करण्याऐवजी नागरिकांकडून करण्यात येणारा हलगर्जीपणा हा अधिक जबाबदार असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे.
सध्या कोल्हापूर जिल्हा हा चौथ्या स्तरामध्ये असला तरी निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे हा दर पुन्हा वाढतो की काय अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. शनिवारी आणि रविवारी कोल्हापुरात कडक लॉकडाऊन लावण्यात आला असून नागरिकांना बाहेर पडू नयेत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा