Breaking

शनिवार, ३१ जुलै, २०२१

माजी आमदार कालवश गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; भावनिकतेचा बांध फुटला

 


मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


सोलापूर : महाराष्ट्राचा राजकारणातील आदर्शवत व्यक्तिमत्व भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने तमाम शेतकरी,कामगार व वंचित घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सांगोला तालुक्याचे विकासाचे शिल्पकार ठरलेले माजी आमदार, मंत्री व शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

     यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री शहाजीबापू पाटील, बबनराव शिंदे, समाधान आवताडे, अनिल बाबर, शेकापचे जयंत पाटील, सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सुमनताई पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगोल्याच्या नगराध्यक्ष राणीताई माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सर्वश्री अण्णा डांगे, प्रा राम शिंदे, लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री महादेव जानकर,माजी आमदार सर्वश्री रामहरी रुपनवर, राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, प्रकाश शेंडगे, नारायण पाटील, बाळाराम पाटील, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उत्तमराव जानकर आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

      आबासाहेबांच्या वर प्रेम करणारे शेतकरी,कामगार,महिला तसेच शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्रुपूर्ण डोळ्यानी अखेरची सलामी देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा