Breaking

रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

*चांगली पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण : सिने व नाट्य अभिनेते मा.धनंजय जोशी*


 विज्ञान शाखेचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा


*प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


     जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर IQAC आयोजित, विज्ञान शाखेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेते मा.धनंजय जोशी, अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे सचिव मा.डॉ.महावीर अक्कोळे, खजिनदार मा.पद्माकर पाटील व प्र. प्राचार्य प्रो. डॉ.एन.पी.सावंत होते.


  कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ.एन.पी.सावंत यांनी केले. आपल्या प्रास्ताविके मध्ये विज्ञान शाखेचा माजी विद्यार्थी मेळावा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांची ओळख सायन्स विभागाच्या उपप्राचार्य प्रो.डॉ.सौ. एम.व्ही.काळे यांनी करून दिली.


   प्रमुख अतिथी मा.धनंजय जोशी ग्रीन एफएम सांगली येथे आर जे तसेच मोरूची मावशी,टोपीवाले कावळे अशा अनेक मराठी चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारलेले आहेत. धनंजय जोशी यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व विनोदी शैलीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या मनोगतामध्ये त्यांनी समाजामध्ये शिक्षक चांगला असेल तर पुढील पिढी चांगली घडेल, शिक्षकांची भूमिका ही पिढी घडविण्यामध्ये व त्यातून राष्ट्राच्या उभारणीमध्ये महत्त्वाची असते. तसेच बळीराजाचे महत्त्व किती आहे व त्याचे कार्य समाजासाठी किती उपयोगी आहे, असे त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणांमधून स्पष्ट केले. माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेले ज्ञान इतरांना द्यावे जेणेकरून ज्ञानाची कवाडे इतरांना खुली होतील तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी गुरुचे महत्व त्यांनी बोधकथेतून  स्पष्ट केले. 

  अध्यक्षीय मनोगतामध्ये स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या कार्याचं कौतुक केले.  महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये देवचंद शहा, डॉ. धनपाल झेले व रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कार्य व अनुभव सांगितले, तसेच विद्यार्थ्यांचे यश हे आमचे धन असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासाठी धनापेक्षा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळे बदल घडवून आणण्यासाठी मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी IQAC कॉर्डिनेटर डॉ. टी.जी. घाटगे यांनी NAAC संदर्भात माजी विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट केली. माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आजी विद्यार्थ्यांना तसेच नवीन अभ्यासक्रमाबाबत वेगवेगळ्या क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. याप्रसंगी माजी विद्यार्थी श्री.प्रविण माळी(वनस्पती व प्राणिशास्त्र विभाग), श्री.शुभम चौगुले व श्री.अभिजित भांदिगरे(रसायनशास्त्र विभाग) महाविद्यालया संदर्भातील आपले अनुभव व्यक्त केले.

  तसेच संस्थेचे सदस्य श्री. अशोक शिरगुप्पे, प्रा.अप्पासाहेब भगाटे, श्री. अभिजीत अडदंडे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष  प्रा.डॉ. अप्पासाहेब पुजारी, सचिव डॉ. प्रभाकर माने, खजिनदार डॉ. एम.जे.बुरसे तसेच प्रा. डॉ.एस.बी.बनसोडे व संजय चावरे, विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान शाखेतील सर्व घटकाने उत्तम नियोजन व सहकार्य केले.

      या कार्यक्रमाचे आभार डॉ. पी.पी. चिक्कोडे यांनी मानले. प्रा. डॉ. सौ.सुनंदा शेळके यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.

     विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थी मेळाव्याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्याकडून भविष्यात ही अशा प्रकारच्या मेळाव्याच्या आयोजनाबाबतची अपेक्षा व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा