Breaking

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

*विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांचा मान राखावा : मा.राजेंद्र मस्के*


जयसिंगपूर कॉलेजमध्ये मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व प्र. प्राचार्य  डॉ. एन. पी.सावंत


*प्रा.डॉ.महावीर बुरसे : उपसंपादक*


 जयसिंगपूर  :  जयसिंगपूर कॉलेज येथे 5 सप्टेंबर भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य नितीश सावंत होते.

     मा.राजेंद्र मस्के मनोगतामध्ये म्हणाले, विद्यार्थ्यांनी आयुष्यात नेमके ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी पुढे वाटचाल करावी. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून मैदानी खेळ अंगीकारावे असे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी आई वडील व शिक्षक यांचा मानसन्मान राखावा व आई-वडिलांच्या कष्टांचा नेहमी आदर करून आपल्या आयुष्यात यशस्वी बनवून दाखवावे. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम तसेच कोणत्या गुन्ह्यामुळे विद्यार्थ्यांची आयुष्य कसे प्रभावित होऊ शकते याची काही ज्वलंत उदाहरणे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. या प्रसंगी निर्भया पथकाच्या प्रमुख मा.बडे मॅडम यांनी विद्यार्थिनींना अडचणीच्या प्रसंगी कोणते पर्याय आहेत व त्यांच्या संदर्भात असणाऱ्या कायद्यांची सविस्तर माहिती विद्यार्थिनींना दिली. 


     आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य प्रो. डॉ. एन. पी.सावंत यांनी  विद्यार्थ्यांनी आपल्या वर्तवणुकीत बदल करणे आवश्यक असून शाहू, फुले, आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन चरित्र वाचून त्या पद्धतीने आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल करावा. विद्यार्थ्यांनी नाचापेक्षा वाचन करून आपले ज्ञान वृद्धिंगत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी प्राचार्य श्री. हर्षवर्धन पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यार्थिनी कु.आरती कांबळे हिने करून दिले. याप्रसंगी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये आलेला शिक्षक दिनाचा अनुभव सांगितला. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त झालेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना याप्रसंगी बक्षीस देऊन गौरविण्यात आले. 

   कार्यक्रमाचे आभार कु.उमा अस्वले हिने मानले तर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन मेहेक व श्रेया यांनी केले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभागाचे सुपरवायझर डॉ.एम.जे. बुरसे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री. सुनील चौगुले, श्री. बी.ए. पाटील,सौ.अंजना चावरे, सौ. स्वाती बस्तवाडे, सौ. अमृता पाटील, सौ. कल्पना पाटील, श्री. शितल पाटील, श्री.ए.जे. पवार, श्री. सुशांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी अकरावी व बारावी आर्टस व  कॉमर्स मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा