Breaking

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

पंडित श्रीपाल बदामे नाईक क्लार्क भारतीय सेना सेवेतून सेवानिवृत्त ....



✍🏼 टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे


टाकळीवाडी :  येथील पंडित श्रीपाल बदामे हे 27 नोव्हेंबर 2002 आसाम या ठिकाणी सैन्य दलात भरती झाले होते.

         भारतीय सेना मध्ये नायक क्लार्क या पदावरून ते सेवानिवृत झाले. त्यांचे टाकळीवाडी गावी जंगी स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. ते आतापर्यंत आसाम, पठाणकोट पंजाब, सिमला, गांधीनगर गुजरात,नऊ सेरा जम्मू ,पश्चिम बंगाल, या ठिकाणी ते आपली सेवा बजावली.व अखेर सिमला येथून ते सेवानिवृत्त झाले.

      त्यांचे शिक्षण बी.ए . झाले आहे. ते भारतीय सेना मध्ये 20 वर्षे आपली सेवा बजावली. अतिशय परिस्थिती हालाखीची होती .अतिशय जिद्दीने त्यांनी आसाम या ठिकाणी भरती झाले.

      बोलताना म्हणाले की मला आता देश सेवेबरोबर  इथून पुढे मला समाजकार्य करायचे आहे.निस्वार्थपणे मी इथून पुढे समाजासाठी गावच्या हितासाठी काम करेन.

      यावेळी यांचा सत्कार गावातील  राजेंद्र निर्मळे भारतीय सेना गुप्तचर विभाग, ऑर्नरी कॅप्टन रमेश निर्मळे,  सुभेदार केंदबा कांबळे, दादा खोत ,गोपाल निर्मळे, सुभेदार संजय बदामे, महादेव बदामे, गावचे सर्व आजी-माजी सैनिक गावकरी मित्र मंडळ, व बदामे परिवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा