Breaking

रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

*विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकीसह राष्ट्रप्रेम जोपासला पाहिजे : धनाजी चुडमुंगे यांचे प्रतिपादन



*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*


 शिरोळ : येथील यशोदीप क्लासेस शिरोळ, नृसिंहवाडी व औरवाड मधील इयत्ता 10 वी व 12 वी सदिच्छा निरोप समारंभ , शिरोळ येथील शाहू वाचनालय च्या सभागृहात रविवार दि २ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी 10 वा.आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महादेव गायकवाड व अध्यक्षस्थानी मा. धनाजी चुडमुंगे उपस्थित होते.

  धनाजी चूडमुंगे मार्गदर्शन करताना म्हणाले, राजू काळे व अमोल गावडे  यांनी शिरोळ तालुक्यात उज्वल निकालाची यशस्वी परंपरा जोपासली आहे.गेली दोन दशके  ग्रामीण भागातील शिक्षणाच्या  प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका  बजावणारा तालुक्यातील नावाजलेला क्लास म्हणून यशोदीप क्लासेस कडे पाहिले जाते.तसेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रगतीचा रस्ता हा शिक्षणामधूनच जातो व शिक्षणातूनच  यशस्वीतेची वाटचाल सुरू होते.शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी  राष्ट्राप्रती प्रेम, राष्ट्रभावना सुद्धा जोपासली पाहिजे तसेच सामाजिक बांधिलकी  सुद्धा जपली पाहिजे.

    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण मा.महादेव गायकवाड  यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील खडतर वाटचाल तसेच नवीन तंत्रज्ञान, आपल्याकडील असलेल्या ज्ञानाचा कसा उपयोग केला जाईल  हे सांगितले. तसेच डिसिप्लिन, प्रॅक्टिस,लर्निंग एटीट्यूड,आणि गोल हे छंद कसे असले पाहिजेत याचे सविस्तर मार्गदर्शन केले.

 बहुसंख्य विद्यार्थ्यांनी क्लासच्या सुरुवातीपासून ते निरोपाच्या क्षणा पर्यंत क्लास संदर्भाच्या आठवणींना उजाळा दिला यामध्ये अपूर्वा किनिंगे,वेदिका संकपाळ,  मयुरी संकपाळ, मोक्षा मरजे,आरती पोतदार, आलिया नालबंद,  रिजा जमादार, निशा आगरे गायत्री जोशी,सानिका कदम,श्रावणी मोरे, गौरी भातमारे व श्रेया मोरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

 नृसिंहवाडी शाखेच्या विद्यार्थ्यांनी क्लासला इंटरॅक्टिव्ह पॅनल साठी  मदत केली. तसेच गायत्री जोशी या विद्यार्थिनीने क्लाससाठी  भेटवस्तू दिली. याप्रसंगी क्लासचे प्रा.अमोल गावडे, प्रा.राजू काळे, प्रा सौ.स्मिता पाटील, प्रा सौ.प्रियांका चौगुले, प्रा.सुनील मगदूम या शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.

   या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून लगाम नेटवर्कचे संपादक भूषण गंगावणे  व सामाजिक कार्यकर्ते कृष्णात देशमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चिदानंद अळोळी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा