Breaking

गुरुवार, ८ मे, २०२५

*प्रा. संदीप पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून पीएच.डी. पदवी संपादन ; मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. जयवंत इंगळे*

 

प्रा. संदीप पाटील व मार्गदर्शक प्रा.डॉ. जे.एस.इंगळे


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज कोल्हापूर चे अर्थशास्त्र विषयाचे  प्रा.संदीप रामगोंडा पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर मार्फत अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी.पदवी संपादन केली आहे.

    प्रा.संदीप पाटील यांनी "रोल ऑफ कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस इन रुरल डेव्हलपमेंट इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट "या विषयावर पीएच.डी. प्रबंध शिवाजी विद्यापीठास सादर केला होता. शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे कार्यशील चेअरमन व माजी प्राचार्य प्रा.डॉ.जयवंत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य यशस्वीपणे पूर्ण केले. 

डिक्लेरेशन प्रमाणपत्र प्रदान करताना प्र-कुलगुरू डॉ. पी एस पाटील


    मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. महादेव देशमुख, प्रा.डॉ. पी.एस. कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

    श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, सचिव प्राचार्य मा.शुभांगी गावडे,सीईओ मा.कौस्तुभ गावडे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर आर कुंभार व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी  प्रा. संदीप पाटील यांचे अभिनंदन केले.

     प्रा. संदीप पाटील हे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुपरिचित असलेल्या व्यक्तिमत्व आहे. अर्थशास्त्र विषयातील  नाविन्यपूर्ण व उपक्रमशील अध्यापन पद्धतीमुळे ते विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक आहेत. विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्याची आवड, शिक्षणातील गोडी,जिज्ञासू व संशोधक वृत्ती जोपासली असल्याने त्यांनी अनेक गुणवत्तापूर्ण संशोधन पेपरचे प्रकाशन व सादरीकरण केले आहे. अर्थशास्त्र व सामाजिक विषयावर शेकडो व्याख्याने दिले आहेत. वीर सेवा दलाच्या माध्यमातून व्याख्याने व सामाजिक कार्य अत्यंत उत्तम पद्धतीने पूर्ण करीत आहेत.

   प्रा.पाटील यांचा बोलका स्वभाव,त्यागी वृत्ती, मानवतावादी दृष्टिकोन व सेवाभावी वृत्तीमुळे एक समाजभान असणारे व सामाजिक संवेदनशील व्यक्ती म्हणून समाजासाठी त्यांचं कार्य अविरतपणे सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात समाजासाठी केलेली उल्लेखनीय कामगिरी आजही स्मरणात आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध कॅम्पचे आयोजन केले आहे. तसेच NIC Camp व प्रेरणा कॅम्पचे शिवाजी विद्यापीठाचे टीम लीडर म्हणून उत्तम कामगिरी केली आहे.

      आजतागायत ते अनेक पुरस्कारानी सन्मानित झाले आहेत.1)क्रांतीसूर्य फौंडेशन कडून आदर्श शिक्षक पुरस्कार

2 ) दैनिक जनमत यांचेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार

3) सहयाद्री शिक्षणरत्न पुरस्कार

4 ) जिल्हा निवडणूक अधिकारी कोल्हापूर यांचेकडून उत्कृष्ट संपर्क अधिकारी पुरस्कार

5 ) आहिल्या महोत्सव 2025 मध्ये उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार

6 ) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार

        प्रा. संदीप पाटील यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगलेसह समाजातील अनेक मान्यवर घटकांनी आनंद व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा