Breaking

शनिवार, ७ जून, २०२५

*सामाजिक सलोखा जपणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : पोलीस निरीक्षक मा.शिवाजी गायकवाड*

 

शिरोळ पोलीस ठाणे पथसंचलन

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


शिरोळ :  बकरी ईद, वटपौर्णिमा, बेंदूर यासह अन्य धार्मिक सण, उत्सव, सोहळे साजरे केले जाणार आहेत. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर शिरोळ शहरात शुक्रवार दि.६ जून २०२५ रोजी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलीस संचलन करण्यात आले.

       शिरोळ पोलीस ठाण्यापासून सुरू झालेले संचालन जय भवानी चौक, संभाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे एसटी स्टँड परिसर या ठिकाणी करण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक शीतल पालेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान यामध्ये सहभागी झाले होते.

   पो. नि. गायकवाड म्हणाले, पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून सर्वांनी धार्मिक सण उत्साहात व आनंदाने साजरे करावेत.सामाजिक सलोखा जपणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. सामाजिक शांतता व सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा