![]() |
सामाजिक कार्यकर्ते मा.सुरेश पुकाळे |
प्रा.डॉ.प्रभाकर माने/ मुख्य संपादक :
जयसिंगपूरचे सामाजिक व संवेदनशील कार्यकर्ते मा. सुरेश पुकाळे यांची श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाजाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले आहे.
श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज, महाराष्ट्र राज्य ही संस्था राज्यभर समाज उद्धाराचे कार्य करणारे एक अग्रणी संस्था असून श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कार्याचा वसा घेऊन वाटचाल करणारी ही संस्था आहे या संस्थेने आजवर अनेक मोठे समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे पुर्ण केली आहेत.
या संस्थेच्या नूतन कार्यकारिणी नियुक्ती करण्याचा काम चालू आहे आज पर्यंत जे सामाजिक कार्य केले आहे त्यांचा योग्य आदर राखून समाज विकासाच्या उत्थानासाठी अखंडितपणे सेवाभावी वृत्तीने व तत्परतेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य नामदेव शिंपी समाज संस्थापक अध्यक्ष श्री विनायक तांदळे साहेबांनी या संस्थेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी मध्ये कोल्हापूर जिल्हाध्यक्ष या पदावर मा. सुरेश पुकाळे याची नियुक्ती केली आहे अशा आशयाचे पत्र सुरेश पुकाळे यांना मिळाले आहे. त्यांच्या या नियुक्तीने खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यातील श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाजाला बळ मिळणार आहे.
जयसिंगपूर शहरातील सुरेश पुकाळे नामक हे व्यक्तिमत्व समाज बांधवाबरोबर इतर समाजाला ही वेगवेगळ्या मदतीच्या माध्यमातून व सामाजिक संवेदनशीलतेमुळे परिचयाचे झाले आहे. सुरुवातीपासून त्यांचा प्रवास हा अत्यंत खडतर होता परंतू जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी यावर मात करून आपल्या पडत्या काळात समाज बांधवबरोबर इतर समाज घटकांना ही त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाची मदत केली होती. विद्यार्थिदशेपासूनच सामाजिक भान असल्यामुळे तन व मन लावून सुरुवातीला त्यांनी काम केलं. परंतु व्यवसायाच्या जोरावर आर्थिक वाढीबरोबर वैचारिक व सामाजिक प्रगल्भता वाढत गेली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यथाशक्य अशी आर्थिक मदत समाजातील गरजू व गरीब घटकांना ते करीत असतात. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने सामाजिक जाणीव व संवेदनशीलता समाज बांधव व इतर समाजाच्या मित्रांमध्ये निर्माण करून मानवतावादी राष्ट्रीय काम केले आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'कवडसा सोशल फाउंडेशनच्या' उपाध्यक्ष या पदा पेक्षा सामाजिक कार्याला अधिक महत्त्व दिले. डॉ.महावीर अक्कोळे, प्रा.डॉ.प्रभाकर माने, शितल चव्हाण(सर), प्रा.बाळगोंडा पाटील व बंडू उरुणकर यांच्या माध्यमातून या सामाजिक संस्थेची निर्मिती करून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मित्रांना एकत्रित करून सामाजिक कार्याचा वसा त्यांनी जपला आहे. तसेच ते शिवनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असून तरूणाईला एका विशिष्ट संस्कारक्षम धाग्यात बांधण्याचे काम त्यांनी या ग्रुपच्या माध्यमातून केले आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी दाखवलेली माणुसकी व मदत वाखाणण्याजोगी होती.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे १३ वर्षापूर्वी एका शारीरिकदृष्ट्या असमर्थ व निराधार असलेल्या वृद्ध महिलेला दत्तक घेऊन उत्तम वाणी व कुशल नेतृत्वामुळे विविध जातीच्या मित्रांना एकसंघ करून शेवटपर्यंत त्या महिलेला आई प्रमाणे आदराची वागणूक देऊन तिची प्रामाणिक सेवा केली होती. त्यामुळे सुरेश पुकाळे नावाचं हे सामाजिक भान जपणारे हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने या पदाला योग्य असे आहे. आता मात्र कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदामुळे त्यांची जबाबदारी वाढली असून यापुढेही त्याच वेगाने समाज व समाज बांधवांच्या चौफेर उत्कर्षासाठी सदैव प्रयत्नशील असणार आहेत.
सामाजिक क्षेत्रातील उत्तम कार्य,प्रामाणिकता,कर्तव्यदक्षपणा, प्रभावी व्यक्तिमत्व व उत्तम नेतृत्वामुळे सामाजिक सलोखा व प्रचंड सामाजिक अनुभव या सर्व गोष्टींचा लाभ समाजाच्या उत्कर्षासाठी होणार आहे. खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे व कार्यनिष्ठ असणारे सुरेश पुकाळे यांना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हे पद मिळाल्यामुळे समाज बांधवाबरोबर इतर समाजातील घटकांना ही आनंद झाला आहे.
त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात सातत्याने पाठीशी उभे असणारे जयसिंगपूरचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. अभिमन्यू खटावकर, डॉ. पांडुरंग गाणबावले,सुनील वायचळ, विनोद पोरे, दिलीप गाणबावले, अनंत गाणबावले, विजय खटावकर व कृष्णकांत आंबेकर यांचे वेळोवेळी यथोचित मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा