मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
उदगाव टोल नाक्याजवळ पाणी कमी झाल्याने कोल्हापूर-सांगली महामार्ग मंगळवारी सकाळी वाहतुकीस खुला करण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने चाचपणी करून वाहतूक सुरू झाली. शनिवारपासून (ता. २४) टोल नाक्याजवळ रेल्वे ओव्हर ब्रिजखाली पाणी आल्याने मार्ग वाहतुकीस धोकादायक बनल्याने बंद केला होता. शनिवारपासून विविध राज्यातील अवजड वाहतूक करणारी वाहने महामार्गावर थांबून होती. चालक-वाहकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात होती. मंगळवारी सकाळी वाहतूक सुरू झाल्याने ही वाहने मार्गस्थ झाली. रात्रीत सुमारे सात ते आठ फूट पाणी ओसारल्याचा अंदाज आहे. इंधन, गॅस, ऑक्सिजन, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू झाली.
राधानगरी धरणाचे तीन दरवाजे दुपारी बंद झाले. विसर्गही कमी झाला आहे. जिल्ह्यासह धरणक्षेत्रात पावसाने उघडीप दिली. दानोळी (ता. शिरोळ) येथील सुमारे १७० पूरग्रस्तांना तेथील शाळेत विस्थापित केले. जयसिंगपूर परिसरातील मौजे कवठेसार येथील पुराचे पाणी कमी झाले असले, तरीही दानोळी, उदगाव येथे पाणी आहे. ते कमी झाल्यावरच कोल्हापूर-सांगली मार्गातील उदगाव येथील रेल्वे पुलाजवळील वाहतुक खुली होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा