Breaking

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

बहुजन वंचित आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाद्वारे मदतीचा हात

 


प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी


मा.बाळासाहेब आंबेडकर आणि  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा.रेखा ठाकूर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूरग्रस्त भागातील लोकांना अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

      मुळात कोल्हापूर जिल्हा दरवर्षी पुराने किंवा महापुराने वेढला जातो अशावेळी या पूरग्रस्त नागरिकांना मदत करणे ही आपली नैतिक जबाबदारी असून त्या प्रित्यर्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पूरग्रस्तांना बस्तवाड, कुरूंदवाड, अकिवाट, दानवाड, हेरवाड, राधानगरी, भुदरगड व अन्य गावामध्ये अशा अनेक ठिकाणी जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.

             त्यावेळी मुंबई निरीक्षक मा.आनंद जाधव साहेब तसेच दक्षिण ईशान्य मुंबई व घाटकोपर तालुका पश्र्चिम परुष व महिला कार्यैकर्ते उपस्थित होते.दक्षिण ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष.मा.संदीप पानपाटील, गोविंडी तालुकाध्यक्मा.सतीश राजगुरू,तालुका अध्यक्षा सौ.अनिता पाटोले ताई, आद.नंदा डोके,संजिवनी माने,मनिषा धनवे,शितल दिक्षित,घाटकोपर तालुका पश्चिम, उपाध्यक्ष सुरेश कनकुटे,संघटक केरुभान ससाणे,उप संघटक सुनिल जाधव व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे सर, विश्वास कांबळे, सुगंधा डोंगरे, जूबेर मोमीन, अँड. ममतेश आवळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

   वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना केलेल्या या मदतीबद्दल सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. बहुजन वंचित आघाडीचे हे रचनात्मक काम बहुजन समाजासाठी मदतीचा रूपाने नैतिक पाठबळ ठरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा