प्रा.चिदानंद अळोळी : नृसिहवाडी प्रतिनिधी
औरवाड : कोरोना साथीबरोबर महापुराने रौद्ररूप धारण करून शिरोळकरांना हैराण करून सोडले होते. मात्र महापुराच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे. मात्र खरी समस्या ही महापुरानंतर असते त्यामुळे महापुरानंतर पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये तसेच संपूर्ण भाग जंतुविरहीत व्हावे यासाठी औरवाड मध्ये शहजादि फौंडेशन मार्फत सोडियम हायड्रोक्लोराईड सह इतर जंतूनाशक फवारणी करण्यात आली.
फौंडेशनचे काशिफ पटेल, नोमान पटेल, शाहीद पटेल , शाहीद आलम चौगुले, सुरज सुतार , मुसदीक पटेल व त्यांचे इतर सहकाऱ्यांनी केलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा