Breaking

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

सकारात्मक मैत्रीच्या नात्यामुळे जीवनात आनंद बहरतो : लेखक, एम.के. मजुमदार

 

सौजन्य : Flickr.com.


सौंदर्या पोवार  : विशेष प्रतिनिधी


      आयुष्याच्या अनेक वळणावर शेकडो मित्र-मैत्रिणी भेटत असतात मात्र आपण योग्य त्या मित्राची पारख करून मैत्रीचा अतूट नातं जोपासण्याचा प्रयत्न करतो. पण कित्येक वेळा चुकीच्या मित्रा बरोबरची जवळीकता ही आयुष्याला पूर्णविराम देणारी ठरते. त्यामुळे मैत्रीचे नातं जोपासताना आनंदी,समाधानी, सकारात्मक विचार करणारा, संकटात धावून येणारा व केलेल्या मदतीची कधीही चर्चा न करणारा मित्र मिळविणे महत्त्वाचं असतं. मात्र आपण भावनेच्या आहारी जाऊन काही क्षणासाठी केलेली मदत किंवा कृत्रिम प्रभावाला बळी पडतो व  सोयीनुसार वापरणाऱ्या मैत्रीच्या जाळ्यात अडकतो आणि आयुष्याच्या मार्गावर असंख्य प्रश्न स्वतः निर्माण करतो.

     मित्रांनो अर्ध्या भरलेल्या पेल्याला अर्धा रिकामा मानणारे नेहमी नकारात्मक विचार करतात. आयुष्यात मित्रही असे असतील, तर नकारात्मकता असणे स्वाभाविक आहे. नकारात्मक विचार करणारे, कामात मोडता घालणारे, चुकीचा सल्ला देणारे अशा मित्रांपासून दूर राहा. 'सकारात्मक विचार करणारे मित्र आयुष्य अधिक चांगले करतात. कसे, ते जाणून घेऊ...

  इस्त्रायलचे मानसशास्त्रज्ञ डॉ. शोधारिंगीजोन हे एका व्यापक अभ्यासाअंती या निष्कर्षाप्रत पोहचले, की 

१)चुकीचे मित्र निवडल्यामुळे आयुष्यातील आनंदाची पातळी ४५ टक्के कमी होते. आयुष्यातून ४५ टक्के आनंद कमी होणे म्हणजे घोर संकटात बुडण्यासारखे आहे. यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वाईट मित्रांना आपल्या आयुष्यातून खड्यासारखे दूर करा. त्यामुळे आनंद तुमच्याकडे स्वतःहून येईल.ज्यांना मित्र नसतात किंवा कमी असतात,  त्यांच्या आयुष्यात आनंद कमी असतो. 

२) ऑस्ट्रेलियातील स्टडी ऑफ एजिंगच्या मते, 'आयुष्यात आनंद वाढवायचा असेल, तर मित्रांची संख्या वाढवा.' संशोधकांनुसार, आनंद व आपला मूड आशादायी करण्यासाठी मित्रांची आवश्यकता असते.संशोधकांच्या चमूचे प्रमुख प्रो. लोफ फोर्ड म्हणतात, की कुटुंबातील सदस्य व मित्रांचे सख्य, आपलेपणा यामुळे आयुष्यावर विलक्षण प्रभाव पडतो. जा जास्त मित्र सोबत असल्यास आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना खूप सहज सामोरे जाता येते.

३) संशोधकांना हे निष्कर्ष काढण्यासाठी जवळपास २०१० वर्षे लागली. या दरम्यान त्यांनी १५ हजारांहून अधिक लोकांचे निरीक्षण केले. अभ्यासातून त्यांना असे आढळले, की धन-संपत्ती, राहणीमानाची साधने या घटकांपेक्षा लोकांना आपले मित्र आणि कुटुंबात जास्त आनंद आणि विश्वास मिळतो.

     ४) मानसशास्त्रज्ञ डॉ. रिजवान वाही यांच्यामते, आपल्या मेंदूत मिर न्यूट्रॉन्स असतात, जे आपल्याला दुसऱ्यांच्या भावनांची जाणीव करून देण्यात मदत करतात. सायकियाट्री रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात, की आपल्या आसपास नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची गर्दी असेल, तर त्यांना दूर करा. अन्यथा, ते तुम्हाला त्यांच्यासारखेच बनवतील.

       सरतेशेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असणे गरजेचे आहे परंतु तो कोणत्या स्वभावाचा आहे हे ओळखून त्यानुसार निर्णय घेणे योग्य होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा