अजित फरांदे यांचे दुःख निधन |
आदिनाथ पाटील : अकिवाट प्रतिनिधी
अकिवाट( शिरोळ तालुका) येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे माजी उपसरपंच श्री अजित फरांडे यांचे 17 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गावच्या राजकारणातील एक निर्भयी आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या हाजिरजबाबीपणा आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर सामाजिक कार्यात ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने गाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे.माजी उपसरपंच ,जनता सोसायटीचे विद्यामान अध्यक्ष, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष,सिद्धेश्वर यात्रा कमिटी अध्यक्ष, विद्यासागर शैक्षनिक संकुलाचे संचालक या त्यांच्या सामाजिक कारकिर्दीतील काही गोष्टी होत. गावाच्या सर्वच वर्गातील लोकांशी त्यांनी नाळ जोडलेली होती, त्यामुळे त्यांच्या जाण्याने समस्त गाव शोकाकुल झाला.
फरांडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समर्थक होते. ते स्वाभिमानीचे तालुका कार्यकारिणी सदस्य होते. माजी खासदार राजू शेट्टीचे निकटवर्तीय होते आणि त्यांच्या सोबत फरांडे यांनी शेतकरी चळवळीत अनेक वर्षे काम केलं, तसेच गावचं ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या यात्रा कमिटीतर्फे ही त्यांनी अनेक वर्षे आपले अमूल्य योगदान दिलं.पण विशेषतः गावचे तंटा मुक्त अध्यक्ष म्हणून त्यांची निर्माण झालेली विशेष ओळख गावकऱ्यांच्या मनातून कधीही पुसून जाऊ शकली नाही.
काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार चालू होते.पण रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली आणि 'वाघ हरपला' हे उद्गार अकिवाटकरांच्या तोंडून येऊ लागले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा