Breaking

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

आंदोलनाच्या दरम्यान दिलेला शब्द शासनाने पाळला नाही म्हणून १३ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूरात मोर्चा : सुरेश सासणे

 

आंदोलनकार, सुरेश सासणे


मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


जयसिंगपूर : सामाजिक कार्यकर्ते व पूरग्रस्त-वंचित घटकांचे नेते सुरेश सासणे यांच्या नेतृत्वाखाली विशिष्ट  मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं.मात्र पूरग्रस्त, पिडीत व वंचितांना आंदोलनाच्या वेळीस शब्द दिला म्हणून हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं. मात्र शासनाने आंदोलन दरम्यान दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानावर जयसिंगपूरला आम्ही १३ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचे संस्थापक सुरेश सासणे यांनी जय हिंद न्यूजला दिली आहे.

    सुरेश सासणे म्हणाले की, सानुग्रह अनुदान प्रत्येकाच्या खात्यावर १० हजार ,लाईट बिले माफ व ५ महिन्यांचे पेन्शन या मागण्यांची पूर्तता आजतागायत झालेली नाही. तसेच संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा म्हणून ३-३ वर्षे लोक फेऱ्या मारत आहेत, या समितीच्या बैठका दर महिन्याला का होत नाहीत? आणि प्रत्येक महिन्याचे अनुदान प्रत्येक महिन्याला का जमा होत नाही? यासह अन्य मागण्यांसाठी आम्हाला लढा दिल्याशिवाय आता पर्याय  उरला नाही म्हणून हे आंदोलन करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा