Breaking

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

आता बालविवाह झाल्यास गावातील सरपंच , ग्रामसेवक यांचे पद जाणार ?

रूपालीताई चाकणकर,राज्य महिला आयोग अध्यक्षा



 पुणे- राज्यातील वाढते बालविवाहाचं (child marriage)  प्रमाण रोखण्यासाठी  राज्य महिला आयोग(State Women Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे.



      या नियमानुसार महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचं निदर्शनास येईल तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जसं की सरपंच तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी जसं की, ग्रामसेवक, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांची जबाबदारी निश्चित कारावी. त्यानंतर अश्या प्रकारची घटना घडली व त्याची दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावं. ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये करावी. बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचं पद रद्द करण्यात यावे अशी शिफारस असलेले पत्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

      आता यावर मुख्यमंत्री व कायदेमंडळ काय भूमिका घेते यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा