डॉ. राजेंद्र कोळी व प्रो.डॉ. ए.ए. पुजारी |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
प्रा. राजेंद्र कोळी यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाची भूगोल विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त झाली ते सध्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.जयसिंगपूर कॉलेजचे माजी प्राध्यापक प्रो.डॉ.ए.ए.पुजारी यांच्या उत्तम व सुयोग्य मार्गदर्शनाखालील केलेल्या "IMPCAT OF IRRIGATION ON SHIROL TEHSIL OF KOLHAPUR DISTRICT (MAHARASTRA) : A GEOGRAPHICAL ANALYSIS"
या संशोधन शीर्षकाखाली विद्यापीठास पीएच.डी.चा प्रबंध सादर केला होता. शिवाजी विद्यापीठाने सदर संशोधन प्रबंधास मान्यता देत त्यांना भूगोल विषयात पीएच.डी.पदवी प्रदान केली.
प्रा. राजेंद्र कोळी यांची अध्यापनाची सुरुवात प्रिन्स शिवाजी डी.एड.कॉलेज,कुरुंदवाड येथून झाली. सध्या ते जयसिंगपूर कॉलेजमध्ये भूगोल विषयाचे हंगामी प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत. प्रा.कोळी यांनी आपल्या संशोधनाची चमक दाखवित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध सादर व प्रकाशित केले आहेत. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात सातत्याने सक्रिय सहभाग व एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून सर्वांना कॉलेजमध्ये ओळखलं जाते.
विविध उपक्रमात सक्रिय सहभाग |
प्रा.राजेंद्र कोळी यांचे बालपण हे वसगडे ता. करवीर जि. कोल्हापूर व माध्यमिक शिक्षण हे बापूसाहेब पाटील हायस्कूल, वसगडे येथे झाले. त्यानंतर ११ वी छ. शहाजी कॉलेज, कोल्हापूर येथे झाले.पण घरच्या गरिबी व आर्थिक अडचणीमुळे आयुष्याचा पुढचा प्रवास करण्यासाठी जयसिंगपूर येथे आले.त्यानंतर १२वी पासूनचा शैक्षणिक प्रवास जयसिंगपूर कॉलेज येथून सुरू झाला. महाविद्यालयातच बी.ए. पदवीचे शिक्षण २००७ मध्ये पूर्ण झाले. हलाखीच्या परिस्थितीमुळे रोजगार शिवाय पर्याय नाही अशा परिस्थितीत एका बाजूला रोजगार व दुसऱ्या बाजूला शिक्षण सुरु ठेवले. त्यासाठी वेळेप्रसंगी पडेल ते काम करीत कधी फोटोग्राफर, झेरॉक्स सेंटर चालवीत शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान संगणकाचे कोर्ससाठी प्रवेश घेऊन अनेक कोर्स पूर्ण केले .त्यानंतर जयसिंगपूर कॉलेजमध्ये कंत्राटी क्लार्क म्हणून काम २००७ ते २०१० पर्यंत केले. शिक्षणाची आवड व ध्यास असल्याने सन २०११ मध्ये B.Ed. पूर्ण करून स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.शिवाजी विद्यापीठात पीएच.डी.पदवीसाठी प्रवेश २०१४ मध्ये निश्चित करून खऱ्या अर्थाने संशोधनाचा प्रवास सुरू झाला. यामध्ये प्रामाणिकपणे केलेले संशोधन आणि मिळालेले मार्गदर्शन ही खूप मोलाचे ठरले. यासाठी विद्यापीठातील गुरुवर्य डॉ.शिंदे व डॉ.पन्हाळकर यांचे यथोचित मार्गदर्शन मिळाल्याने हे यश संपादन करता आले.
मुळात प्रा.कोळी यांचे आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती मात्र शिक्षणाचा ध्यास व परिवर्तनवादी विचार, जिद्द-चिकाटी, सर्व घटकांशी मैत्रीपूर्ण संबंध याच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आयुष्याच्या खडतर प्रवासात त्यांना अनेक दु:खावर मात करीत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीची जाणीव ठेवून मातापित्यांना आपले दैवत मानून गुरुजनांचा ज्ञान-विचारांचा आशीर्वाद घेत, व जीवाभावाच्या मित्रांच्या साथीने त्यांनी आतापर्यंतचा खडतर प्रवास पूर्ण केला. खरं म्हणजे पदोपदी गरिबी व दुःखाचा डोंगर असतानाही गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. प्रा.राजेंद्र कोळी यांचा जीवनप्रवास हा अत्यंत संघर्षमय राहिलेला आहे त्यामुळे समाजाला आदर्शवत असून परिस्थितीला मात करीत यशाच्या शिखरापर्यंत कसं पोहोचावं त्यासाठी त्यांनी त्यांचा हा संघर्षमय प्रवास दिशादर्शक ठरणारा आहे.
डॉ. राजेंद्र कोळी |
या संशोधन कामी अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव ,खजिनदार,इतर सर्व सदस्य,मा. प्राचार्य ,सर्व गुरुवर्य प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याने ही पीएच.डी. पदवी संपादित करू शकले. तसेच या प्रवासात त्यांना अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले. यामध्ये त्यांच्या पत्नी सौ.स्नेहा राजेंद्र कोळी यांचं सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. एकूण त्यांच्या या प्रवासात रक्ताच्या नात्यापेक्षा गुरुजनांनी व मित्रांनी केलेल्या सहकार्य व विश्वास यामुळेच शिक्षणातील सर्वोच्च पदवी अर्थात पीएच.डी.संपादन करू शकले असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या सुयशात त्यांचे गुरुवर्य मार्गदर्शक प्रो.डॉ.ए.ए.पुजारी यांनी आपल्या आयुष्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी केलेले उत्तम मार्गदर्शन व दाखविलेला विश्वास सार्थ करीत त्यांनी हे कार्य पूर्ण केले. प्रोफेसर डॉ. ए.ए.पुजारी व प्रा.राजेंद्र कोळी हे दोघेजण जयसिंगपूर कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.
प्रा.राजेंद्र कोळी यांनी या संघर्षमय प्रवासावर उत्तम मात करीत भूगोल विषयात पीएच.डी. पदवी संपादन केल्याने सर्व घटकांकडून त्यांचे मनापासून कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हार्दिक अभिनंदन
उत्तर द्याहटवा