Breaking

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

*मिरजेत रक्तचंदन तस्करास केली अटक ; त्याच्याकडून जप्त केले २ कोटी ४५ लाख किमतीचे चंदन*


मिरजेमध्ये पकडला गेला रक्तचंदन तस्कर

*प्रविणकुमार माने  : उपसंपादक*


   मिरज  : आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या २ कोटी ४५ लाख ८५ हजार किमत असून ९८३ किलो ४०० ग्रॅम वजनाच्या रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन विभागाने संयुक्तपणे धाड टाकून पकडले. यावेळी यासिन इनायतउल्ला (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याच्या मुसक्या आवळण्यात आले आहेत.

    आंध्र प्रदेश मधील जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी करून रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपअधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेले रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली.

     त्यानुसार सदर यंत्रणेने मिरज – कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा KA 13 6900 हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये २ कोटी ८५ लाखाचे ९८३ किलो ४००  ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. ते जप्त करण्यात आले असून हे रक्त चंदन नेमके आले कुठून याचा सखोल तपास सांगली पोलीस प्रशासन करीत आहेत.

     मिरज पोलिसांच्या या महत्वाच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा