मंत्रालयात चर्चा करताना पदाधिकारी |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
मुंबई : नृर्सिंहवाडी ते खिद्रापूर पर्यटनासाठी यांत्रिक बोटी ची सोय करण्याबाबत कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशन तर्फे मंत्रालयात राज्याचे पर्यटन मंत्री मा.आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले तसेच पर्यटन राज्यमंत्री मा.अदितीताई तटकरे यांना भेट घेऊन निवेदन देण्यात आले व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशन ही संस्था नृर्सिंहवाडी ते खिद्रापूर या तीर्थक्षेत्राचे पर्यटन कसे वाढेल, त्या परिसरातल्या भागाची शाश्वत विकास व आर्थिक प्रगती कशी वाढेल या दृष्टीने कायमस्वरूपी काम करत असते. नृर्सिंहवाडी व खिद्रापूर हे आमच्या शिरोळ तालुक्याचे वैभव आहेत.या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या पर्यटनाच्या दृष्टीकोनातून म्हणावा तसा विकास झालेला दिसून येत नाही. नृर्सिंहवाडी ते खिद्रापूर जाण्यासाठी म्हणावं तसें रस्ते दिसून येत नाहीत.दरवर्षी येणारा महापूर व निसर्गाचा अनियमितपणा त्यामुळे शेतीचे नुकसान या सर्व संकटाना मुळे इथे परिसरातल्या नागरिकांचे आर्थिक बाजू कमजोर होत आहे.
नृसिहंवाडी व खिद्रापूर हे दोन्ही धार्मिक स्थळे खूप पूर्वी पासून जागृत व प्रचलित आहेत. याचा आधार घेऊन नदीच्या माध्यमातून यांत्रिक बोटिंग / नाव या मार्फत आपण भाविकांची सोय खूप चांगल्या प्रकारचे होऊ शकते असे आमच्या संस्थाच्या सर्वेक्षण मध्ये दिसून आले आहे. नृर्सिंहंवाडी ते खिद्रापूर हे दोन्ही तीर्थक्षेत्र नदिकाठी असल्यामुळे आपण सहजरित्या बोटिंग चालू करु शकतो. या दोन्ही क्षेत्राचे अंतर किमान 20 ते 25 कि.मी.( नदी वाटे) आहे. नृर्सिंहवाडी मध्ये दररोरज अंदाजे सातशे ते हजार भाविक दत्त दर्शनासाठी येतात. या मध्ये किमान शंभर भाविक सुद्धा भाविक जाण्या- येण्याची किचकट व चांगली सोय नसल्यामुळे खिद्रापूर येथे दर्शनसाठी जात नाहीत. यामुळे यांत्रिक बोटिंग पर्यटन हे एक आकर्षण ठरवू शकते. या बोटिंग मुळे दोन्ही ठिकाणी भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढेल यात शंका घेण्याची गरज नाही आणि भाविकांची संख्या वाढत गेली तर इथल्या जवळच्या गावातले सर्व छोटे-मोठे व्यवसाय वृद्धिंगत होतील. व्यवसाय वाढण्यास खूप मोठा हातभार लागेल. सर्व नागरिकांचे आर्थिक बाजू भक्कम होईल. अशी भूमिका फौंडेशनचे अध्यक्ष मा. प्रसाद दुग्गे यांनी मांडली.
पुढील सविस्तर चर्चा पालकमंत्री बंटी पाटील साहेब,नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर ,खासदार धैर्यशील माने,जिल्हाधिकारी यांच्या सोबत पर्यटन विभागची बैठक लवकरच घेऊ असे प्रसाद दुगे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा