Breaking

रविवार, १० एप्रिल, २०२२

*जयसिंगपुरात चाकूने हल्ला केल्याप्रकरणी दोघांच्या वर पोलिसात गुन्हा दाखल*



*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : मुलगीला पळवून नेल्याच्या गैरसमजुतीतून चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.शहरातील यादवनगर येथे चाकूने  हल्ल्या केल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.उमा विलास मस्के व  मुलगा बालाजी मस्के अशी जखमींची नावे आहेत. तर संजय सातव आणि वैभव सातव रा. संभाजीनगर अशा संशयित आरोपींची नावे आहेत. त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. उमा विलास मस्के रा. यादवनगर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

     पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी व त्यांचा मुलगा व पती रिक्षाने जयसिंगपूर पोलीस स्टेशन कडे जात असताना दोन्ही संशयित आरोपी मोटरसायकलवरून येऊन आडवी गाडी लावून फिर्यादी व त्यांच्या पतीस रिक्षातून बाहेर ओढले. माझी मुलगी तुमच्या घरात देणार नाही असे म्हणत शिवीगाळ करीत संजय सातव यांनी धमकी दिली. यानंतर वैभव सातव यांनी आज सायंकाळपर्यंत माझी बहीण घरी आली नाही तर फिर्यादीस उचलून नेऊन तिच्या सोबत लग्न करेन अशी धमकी दिली. कांदा कापण्याचे चाकूने फिर्यादी व त्याच्या मुलावर वार करून जखमी केले आहे. भांडण मिटवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पती व मित्राला ही शिवीगाळ करत मारहाण केली असल्याची माहिती दिली आहे.     


      पोलिसांनी संशयित आरोपीवर कलम  ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल स्मिता कांबळे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा