![]() |
कागलच्या डी. आर. माने कॉलेजमध्ये गांधी जयंती साजरी |
*जुबेर शेख : विशेष प्रतिनिधी*
कागल : इतिहास मंडळ आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 2 आॅक्टोबर गांधी जयंती निमित्त डॉ. आरती चौगले (माजी इतिहास विभाग प्रमुख) यांनी ,"महात्मा गांधी यांचा स्त्री विषयक दृष्टीकोन" या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानात स्वातंत्र्य चळवळीत अनेक स्त्रियांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, सत्याग्रह यामध्ये स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. यामध्ये सरोजिनी नायडू, अरूणा असफअली, इ. स्त्रियांनी गांधीजींनी दिलेला कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. गांधीजींच्या विचारांचे लोन खेड्यापाड्यात पर्यंत पोहोचले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ.संतोष जेठिथोर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगून कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री. कलगोंडा पाटील वय वर्षे ९८ स्वातंत्र्य सैनिक कसबा सांगाव कागल हे होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत राहून महत्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या उपस्थितीमुळे आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वातंत्र्य सैनिकास अनुभवता आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ प्रवीण चौगले यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधीजींचे विचार आजच्या काळात तरूणांना व देशाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. निशांत खाबडे यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कल्पना गुरव यांनी केले. यावेळी प्रा. आबासाहेब चौगले,प्रा. डॉ. आदिनाथ गाडे, प्रा. विनायक जाधव, डॉ. लखन भोगम, आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास शिक्षकेतर कर्मचारी शाहू ऐवाळे, सचिन कांबळे, सोनू मुजावर यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा