Breaking

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

*जयसिंगपूरमध्ये सकल जैन बांधवांच्या विराट मूक मोर्चाद्वारे झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध*


जयसिंगपुरात सकल जैन बांधवांच्या वतीने मूक मोर्चा

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : झारखंड राज्य सरकारच्या जैन धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ अर्थात सम्मेद शिखरजीच्या अन्यायकारी निर्णयाचा शांततामय व अहिंसात्मक मार्गाने विरोध करण्यासाठी सकल जैन समाजाच्या वतीने भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. 

     या बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जयसिंगपूर शहरातील सकल जैन श्रावक-श्राविका व अन्य घटकांकडून विराट मूक मोर्चाच्या माध्यमातून बिहार शासनाच्या निर्णयाला विरोध करीत आयुष्यात्मक व शांततामय मार्गाने मूक मोर्चा काढण्यात आला. सदर मूक मोर्चा हा गल्ली नंबर ४ मधून मार्गस्थ होत क्रांती चौकाच्या दिशेने पुढे जात तो नगरपालिका या ठिकाणी आला. या ठिकाणी शिरोळचे नायब तहसीलदार मा.योगेश जमदाडे यांना निवेदन देण्यात आले.

       या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षाचे नेतेमंडळी व कार्यकर्ते या मोर्चेमध्ये सहभागी झाले होते. जयसिंगपूरातील सर्व व्यापारी घटकांनी सर्व व्यवहार व व्यापार बंद ठेवून शंभर टक्के प्रतिसाद दिला होता. जैन श्रावक-श्राविकांच्या हातामध्ये विविध अर्थपूर्ण दर्शविणारे बोर्ड होते. लहान मुलांच्या पासून सर्व वयोगटातील मंडळी याच्यामध्ये सक्रियपणे सहभागी होते. या मोर्चाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे जैन धर्मातील अहिंसा व शांतता या तत्त्वज्ञानाचे दर्शन घडवित सकल जैन समाज अर्थात दिगंबर,श्वेतांबर,स्थानिकवासी व तेरापंथी हे सर्व समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा