Breaking

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

*भित्तीपत्रक हे समाजाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणारे एक व्यासपीठ : प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे प्रतिपादन*

 

उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. मांजरे, डॉ. व्ही.व्ही. चौगुले, समन्वयक डॉ.के.डी.खळदकर, डॉ.पुजारी, प्रा.पी.सी.पाटील व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये सामाजिक शास्त्र मंडळाच्या वतीने विविध विषयाच्या अनुषंगाने पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व उद्घाटक कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, डॉ. विजयमाला चौगुले व व समन्वयक डॉ. के.डी. खळदकर उपस्थित होते.

      प्रारंभी प्राचार्य डॉ. मांजरे यांच्या हस्ते सामाजिक शास्त्र मंडळामध्ये सहभागी असणारे मानसशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या पोस्टरचे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टरचे उत्तम पद्धतीने सादरीकरण करून विविध सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न केला.

       मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे म्हणाले, भितीपत्रक हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कलाटणी देणारे असून भित्तीपत्रकच्या माध्यमातून सामाजिकतेचे दर्शन घडविणारे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणारे एक व्यासपीठ उपलब्ध होत असते. डॉ.मांजरे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या भित्तीपत्रकाचे उत्तम सादरीकरण करून आपले व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी उत्तम काम केलं आहे.

       यावेळी प्रा.डॉ.ए.ए.पुजारी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जयसिंगपूर कॉलेज कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी येथील प्रत्येक घटकाचा स्वयंविकासासाठी फायदा करून घ्यावा. याप्रसंगी प्रा.पी.सी.पाटील म्हणाले, जयसिंगपूर कॉलेजच्या शैक्षणिक व भौतिक विकासात खूप बदल झाला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक उत्तम महाविद्यालय म्हणून कॉलेजचं नावलौकिक आहे.

      अध्यक्षीय मनोगतात डॉ.सौ. विजयमाला चौगुले म्हणाल्या, भित्तीपत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला आहे. या आधारावरच विद्यार्थ्यांनी आपलं जीवन फलदृप करून करीयर च्या दिशेने वाटचाल करावी. 

     या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.के.डी. खळदकर आणि आभार प्रदर्शन प्रा. सुरज चौगुले यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.

      या कार्यक्रमास डॉ.वंदना देवकर,डॉ. राजू कोळी, प्रा.कविता चानकने, प्रा.सौ. वर्षा चौगुले,प्रा. सुरज चौगुले,प्रा. कु. माधुरी कोळी,प्रा.एन.जी.राठोड,प्रा. ए.बी.परीट ,प्रा.आर.के.कांबळे, प्रा. एम.एस.बागवान,भोलू शर्मा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व संयोजन राज्यशास्त्र विभाग प्रमुख व सामाजिक शास्त्र मंडळाचे समन्वयक डॉ. खंडेराव खळदकर व त्यांच्या साथीदारांनी केले आहे.

    समस्त विद्यार्थी घटकांकडून या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा