Breaking

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

*देशाचा सर्वांगीण, सर्वसमावेशक व शाश्वत विकास हा समस्त घटकांचे ध्येय असले पाहिजे : माजी कुलगुरू प्रा.डॉ. एम.एम. साळुंखे यांचे प्रतिपादन*


राष्ट्रीय परिषदेत बीजभाषक व उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना माजी कुलगुरू डॉ.एम.एम. साळुंखे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महावीर अक्कोळे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये २री राष्ट्रीय परिषद ही वैचारिक व संशोधनात्मक मंथनाद्वारे संपन्न झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक व प्रमुख पाहुणे माजी कुलगुरू प्रा.डॉ.एम.एम. साळुंखे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व  प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे व प्रमुख उपस्थितीमध्ये अशोक शिरगुप्पे,प्रा. आप्पासाहेब भगाटे , बाळासाहेब इंगळे, ऍडव्होकेट नरदे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.

      या राष्ट्रीय परिषदेमध्ये बीजभाषक म्हणून मार्गदर्शन करताना माजी कुलगुरू प्रा.डॉ. साळुंखे म्हणाले, देशाचा विकास अपेक्षित आहे मात्र तो विकास चिरंतन असला पाहिजे. आज संपूर्ण जगाला शाश्वत विकासाची नितांत आवश्यकता असून भविष्यात विकासापेक्षा शाश्वत विकासाला प्राधान्य देणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. ते पुढे म्हणाले, विकासामध्ये विविध क्षेत्रांचे कार्य महत्त्वाचे असते मात्र विकासासाठी ग्रीन कार्डचा अर्थात पर्यावरण पूरक घटकांचा वापर करणे गरजेचे आहे. या संदर्भात जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ही शाश्वत विकासाची कास धरताना पर्यावरण पूरक बाबींचाच विचार  झाला आहे. देशाचा सर्वांगीण, सर्वसमावेशक व शाश्वत विकास हा समस्त घटकांचे ध्येय असले पाहिजे.

      अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे सचिव व प्रसिद्ध धन्वंतरी म्हणाले, शाश्वत विकासामध्ये सरकारचे कार्य हे समाजभिमुक व विज्ञानभिमुख असले पाहिजे.भाकड कथेच्या माध्यमातून विज्ञान शिकवणे चुकीचे आहे. संपूर्ण विश्व हे विज्ञान भिमुख असून प्रत्येक देशाची वाटचाल ही शाश्वत विकासाच्या दिशेने आहे. भारतात मात्र हे दिसून येत नाही. ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये सुयोग्य सहसंबंध असला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा त्या देशाच्या विकासाला मारक ठरतो हे स्पष्ट झाले आहे. यापुढे चिरंतन विकासाचा गांभीर्याने विचार करावा.

        प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.ते प्रास्ताविकेत म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानाचा शाश्वत विकासासाठी कसा वापर करता येईल याचे वैचारिक व संशोधनात्मक मंथन व्हावे. तसेच पर्यावरण पूरकता कशी निर्माण करता येईल. उपप्राचार्य डॉ.सौ.एम.व्ही.काळे यांनी राष्ट्रीय परिषदेतील सर्व विद्यार्थी व मान्यवरांचे स्वागत केले.  पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.बी.एम.सरगर यांनी केले.तर प्रथम उद्घाटन सत्राचे आभार डॉ.जी.एच.निकम यांनी मानले.

     राष्ट्रीय परिषदेच्या प्रथम सत्रात साधन व्यक्ती डॉ. प्रसाद लोखंडे यांनी यांनी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या सत्राचे आभार डॉ. आर.एस. ढब्बे यांनी मानले.

      द्वितीय सत्रात साधन व्यक्ती डॉ. आर. व्ही.गुरव यांनी जैवविविधता व चिरंतर विकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक डॉ.एस. डी. उमडाळे व आभार प्रा.के. आर.कुंभार यांनी मानले.

        सत्र समाप्ती कार्यक्रमात प्रास्ताविक व परिषदेचे मूल्यांकन कार्यकारी सचिव डॉ.पी.पी.चिकोडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.आर.डी.शिंदे यांनी केला.

          सत्र समाप्ती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. आर. आर.कुंभार यांनी परिषदेच्या आयोजन घटकांचे  कौतुक करून शाश्वत विकासासंदर्भात बहुमूल्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. आप्पासाहेब भगाटे म्हणाले, मुळात राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून शाश्वत विकासाच्या विषयावर परिषद भरवणं हे कौतुकास्पद आहे. तसेच भारताने चिरंतन विकासाची कास धरणे गरजेचे आहे.

      या राष्ट्रीय परिषदेतील उपस्थित सर्वांचे आभार परिषदेच्या प्रमुख उपप्राचार्य डॉ.सौ.एम. व्ही. काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ.सौ. सुनंदा शेळके यांनी केले.

या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजच्या सायन्स विभागाच्या वतीने करण्यात आले.

   सदर राष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार मा. पद्माकर पाटील व सर्व संचालक मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.

     या राष्ट्रीय परिषदेचे आयोजक म्हणून प्रमुख उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. एम.व्ही. काळे (प्रमुख), समन्वयक प्रा. डॉ.बी.एम. सरगर, आयोजक सचिव डॉ.पी.पी.चिकोडे, खजिनदार डॉ.जी.एच.निकम, IQAC समन्वयक प्रा.डॉ.टी.जी.घाटगे, सह-समन्वयक प्रा.आर.डी.शिंदे व आयोजक कमिटीतील सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा