Breaking

मंगळवार, ५ मार्च, २०२४

*महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या कृतिशील धोरण व अंमलबजावणीची गरज : ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन*


लीड कॉलेज उपक्रमांतर्गत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ज्येष्ठ विचारवंत व संपादक मा.प्रसाद कुलकर्णी, अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत, लीड कॉलेज समन्वयक डॉ.एस. आर.नकाते व अन्य मान्यवर 


*भोलू शर्मा : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर : महिला आरक्षण विधेयक-२०२३ हे जरी संसदेत मंजूर झाले असले तरी सरकारचे धोरण पहाता ते प्रत्यक्षात लवकर लागू होणार नाही अशा परिस्थीतीमध्ये महिलांनी या विधेयकाला हुरळून न जाता खरेच मोदी सरकार महिलांच्या प्रश्नांबाबत जागरूक आहे का? याचा गांभीर्याने विचार करावा. प्रत्यक्षात विधेयक लागू होण्यासाठी प्रथम जनगणना नंतर संसदेची पुनर्रचना या क्रिया पार झालेनंतर महिला आरक्षण विधेयक अमलात येईल, सरकारने हे विधेयक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली कृती आहे. परंतु महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या कृतिशील धोरण व अंमलबजावणीची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

       जयसिंगपूर कॉलेज व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या 'महिला आरक्षण कायदा २०२३- महिलांचे राजकीय सक्षमीकरण ? या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या उपक्रमांतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील एकूण सहा महाविद्यालये सहभागी झाले होते दोन सत्रामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उ‌द्घाटन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले, अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. नितीश सावंत होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुजाता पाटील यांनी केले.

  कुलकर्णी पुढे म्हणाले की, सध्याच्या बदलत्या युगात स्त्रियांनी न्युनगंड झुगारून पुढे आले पाहिजे तर पुरुषांनी त्यांची पुरुषप्रधान मानसिकता दूर केली पाहिजे. सशक्त समाज घडवण्यामध्ये स्त्रियांची भूमिका महत्वाची आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजविरोध सहन करून स्त्री शिक्षणाचा वसा घेतला, महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले स्त्री समतावादी विचाराचे होते त्यामधूनच क्रांती घडली. मातृत्व हे स्त्री ला मिळालेले स्वयंसिद्धा आहे. आजच्या राजकीय स्थितीमध्ये समाजसुधारणा घडवण्याची ताकद स्त्रियांमध्ये असून स्त्रीने राजकारणातील आपला प्रत्यक्ष सहभाग वाढवला पाहिजे.

       पहिल्या सत्रामध्ये प्रा. डॉ. विजयमाला चौगुले यांनी महिला आरक्षण विधेयका बाबत विवेचन केले. तसेच या विधेयकामुळे राजकारणातील व संसदेतील स्त्रियांचा सहभाग ३३ टक्के होणार असल्याचे नमूद केले. तसेच यापूर्वी ७३ व्या व ७४ व्या घटना दुरुस्तीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेल्या महिला सहभागाचे व त्यामुळे झालेल्या बदलांची नांदी घेतली. सध्याच्या लोकसभेमध्ये महिला खासदारांची संख्या ७८ आहे तसेच राज्य सभेमध्ये एकूण २५० खासदारांपैकी केवळ ११ महिला खासदार आहेत हि संख्या वाढली पाहिजे याकरिता महिलांनी देखील मानसिकता बदलली पाहिजे स्त्री पुरुष समानता अधिक प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे असे प्रा.डॉ.सौ.चौगुले यांनी नमूद केले.

      जयसिंगपूर कॉलेज अग्रणी महाविद्यालय  समन्वयक डॉ.एस. आर.नकाते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, पाहुण्यांचा परिचय डॉ. खंडेराव खळदकर यांनी केला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एन. एल. कदम डॉ.एन.पी.सावंत उपस्थित होते, उपस्थित मान्यवर व कार्यशाळेत विद्यार्थ्यांचे आभार ग्रंथपाल अमर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा