Breaking

मंगळवार, ७ जानेवारी, २०२५


राष्ट्रीय परिसंवादात बीजभाषक म्हणून मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख व सर्व मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


मिरज : येथील न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालय, मिरज येथे 'लिंगभाव संवेदनशीलता व समानता' या विषयावर एकदिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन ६ जानेवारी, २०२५ रोजी करण्यात आले. प्रमुख उद्घाटक व बीजभाषक  सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख ,अध्यक्षस्थानी विनायक गोखले व संस्थेचे सचिव राजू झाडबुके व प्राचार्य डॉ. उल्हास माळकर उपस्थित होते.

    प्रमुख अतिथी दिशा पिंकी शेख या  बीजभाषण करताना म्हणाल्या, आजची बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिसंवाद ही लिंगभाव समानता व मानवतावादी चळवळीच्या दिशेने एक पाऊल पुढे असून लिंगभाव संवेदनशीलसाठी लोक जागृती निर्माण करणारी आहे. भारतीय संविधानाला स्मरून व डॉ. आंबेडकरांच्या परिवर्तनवादी कृतिशील विचारांचा जागर करून लिंगभाव समानता व समतावादी सामाजिक विचारांची पेरणी यानिमित्ताने होते. दिशा पिंकी शेख यांनी तृतीयपंथीय घटकांच्या संदर्भात सामाजिक विवेचन अभ्यासपूर्ण व वास्तववादी पद्धतीने मांडले. शोषित व गुलामी स्त्री होण्यापेक्षा हिजडा बनून जीवन जगणे समाधानकारक असल्याबाबत त्यांनी उपहासात्मक टोला दिला.

      अध्यक्षीय भाष्य करताना संस्थेचे अध्यक्ष विनायक गोखले म्हणाले, लिंगभाव संवेदनशीलता व लिंगभाव समानता या विषयांवर जागरूकता निर्माण करणे आजच्या काळाची गरज बनली आहे. समाजातील लिंगभाव आधारित भेदभाव संपवून स्त्री, पुरुष व तृतीयपंथी तृती या तिघांनाही समान संधी देणे, तसेच लिंगभाव भेदावर आधारित असलेल्या समस्यांवर संवेदनशील दृष्टिकोनातून विचार करणे, ही सामाजिक विकासाची मुख्य पायरी आहे.

   प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून या राष्ट्रीय परिसंवाद आयोजनाचा राष्ट्रीय व सामाजिक संवेदनशील हेतू स्पष्ट केला. 

      प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी लेखिका डॉ. मंजिरी कुलकर्णी लिखित पुस्तक व जर्नल्स प्रकाशन सोहळा श्री मालोजीराजे तिसरे संयुक्त राजे भोसले अक्कलकोट संस्थान अधिपती यांचे हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी माधवराजे पटवर्धन मिरज संस्थान, मिरज व गुरुवर्य प्रा.डॉ.बी.डी.खणे हे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. 

      प्रा. किशोर चौगुले यांनी स्वागत गीत गायले.पाहुण्यांचा परिचय डॉ. शबाना हळंगळी यांनी केला. या कार्यक्रमाचे आभार सौ. नलिनी प्रज्ञा सूर्य मानले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र पाटील, विद्या भोसले व पूजा कांबळे यांनी केला.

     प्रथम सत्रात तज्ञ मार्गदर्शक प्रा.डॉ. अनुरेखा चारी-वाघ यांनी  या उच्च शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून लिंगभाव समानता व संवेदनशीलता या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. सत्राध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. अर्चना जगतकर यांनी काम पाहिले. दुसऱ्या सत्रात लिंगभाव संवेदनशीलता, शिक्षण व समानता या विषयावर डॉ. अतुल साठे यांनी मार्गदर्शन केलं. सत्राध्यक्ष म्हणून  प्रा.डॉ. प्रतिभा देसाई यांनी काम पाहिले. दुसऱ्या सत्रात शोधनिबंध वाचन करण्यात आले.यावेळी अनेक सहभागी प्राध्यापकानी संशोधनात्मक, अभ्यासपूर्ण व प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून हे सत्र पूर्ण केले. तज्ञपरीक्षक म्हणून डॉ.एस.बी. गायकवाड व डॉ.एम. ए. कोरे लाभले होते. 

     समारोप सत्रात प्रमुख अतिथी म्हणून राजू झाड बुके यांनी अभ्यासपूर्ण विवेचन करीत म्हणाले, असे अशा विषयावरचे परिसंवाद गावागावात होणे आवश्यक आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उल्हास माळकर होते. या परिसंवादाचे संयोजक डॉ. गंगाधर चव्हाण यांनी आभार मानले.

      या कार्यक्रमाचे नेटके व उत्तम संयोजन सोशल सायन्स विभागाच्या वतीने करण्यात आले. 

      उपस्थित सहभागी प्राध्यापकांनी या राष्ट्रीय परिसदाबाबत समाधान व्यक्त करीत आयोजक महाविद्यालयाचे मनापासून आभार मानले. या संवेदनशील परिसंवादात शेकडो प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा