![]() |
शाहूनगर येथील श्री महालक्ष्मी जागृत मंदिर |
लेखक श्री.विक्रांत माळी, जयसिंगपूर
जयसिंगपूर येथील शाहूनगर श्री महालक्ष्मी मंदिर मधील महालक्ष्मी देवीची मूर्ती स्थापनेची सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सहा पिढीपासून दादू रावजी माळी, बंडू रावजी माळी, आप्पासो रावजी माळी, दौलत रावजी माळी, सोजिर रावजी व माळी या पाच भावांच्या कडे महालक्ष्मी देवीचे निशाण होते. बंडू रावजी माळी यांना चार पुत्र जन्मास आले होते त्याचे नाव बाबुराव, सुभाषराव, हिंदुराव व श्रीपतीराव असे ठेवले. बाबुराव बंडू माळी यांना महालक्ष्मी देवीचा दृष्टांत झाला. देवी स्वप्नात येऊन त्यांना मंदिर उभारणीचे स्वरूप दिसले. या चारी भावांनी मंदिर उभारण्याची संकल्पना मनाशी बाळगून सन १९७१ रोजी मंदिराचे पायाभरणीचे काम सुरू केले.
![]() |
स्वर्गीय गुरुवर्य माळी |
त्यावेळी उद्घाटक म्हणून पंडित लाला पडियार व देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार होते.गुरुवर्य बाबूराव माळी यांना त्यांच्या तिन्ही बंधूंची अर्थात सुभाष बंडू माळी, हिंदुराव बंडू माळी व श्रीपती बंडू माळी यांची अनमोल साथ लाभली. हे चारही जण हे स्वतः गवंडी काम करीत असल्याने तुटपुंज्या पगारांमध्ये काम करत असताना अर्धा पगार घर खर्चासाठी व अर्धा पगार मंदिराचे कामासाठी खर्च करीत होते. याच काळात जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर चे ग्राउंड सपाटी करणाचे काम सुरू होते. त्यात निघालेले दगड आणून त्याचे उत्तम रित्या दगड घडवून मंदिर उभारणी केली. बांधकामासाठी स्वर्गीय झेले यांच्याकडून चुण्याची मदत झाली.१३ जानेवारी १९७५ रोजी सदर काम पूर्ण झाले. तसेच महालक्ष्मी देवीची मूर्ती पंढरपूर येथे घडविण्यात आली.१४ जानेवारी १९७५ रोजी श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती स्थापना गुरुवर्य श्री बाबुराव बंडू माळी व गुरुवर्य श्री अण्णासो गणू पडियार यांच्या हस्ते करण्यात आली. देवी समोर पहिला गोंधळ पांडुरंग भिसे-गोंधळी यांचा गोंधळी गाण्याचा कार्यक्रम झाला होता. तसेच मंदिराचे उर्वरित काम डॉ. जे जे मगदूम यांच्या अर्थसहाय्याने समोरील सभा मंडप स्लॅब व समोरचे हॉल इतर बांधकाम जयसिंगपूर वाशियाकडून मदतीने पूर्ण केले. या देवीचे महात्म्य ही देवी जागरूक श्रद्धास्थान, देवस्थान व नवसाला पावणारी देवी आहे.
तसेच चैत्र दुर्गाष्टमी १९८८ साली शांताबाई धोंडूबाई माने मुरळी मु. पोस्ट तासगाव यांच्या सांगण्यावरून श्री महालक्ष्मी यात्रेचा उत्सव सुरू केला. या मंदिराच्या पहिला यात्रेसाठी श्रीकांत नलवडे यांनी पालखी देऊन बहुमोल सहकार्य केले. त्या पालखीच्या सजावाजाटी साठी देवाप्पा पुजारी शिरोळ यांनी त्यांच्या मंदिराचे दागिने व सजावटीचे सामान आणून त्यांनी पालखी सजवून त्या सुंदर रित्या छबिन्याला त्यांनी अनमोल सहकार्य केलं.
सदर यात्रेकरिता नांदणी श्री भटारक महाराज यांनी त्यावेळी १०१ रुपयाला हती देऊन देवीची पालखी मिरवणूक महालक्ष्मी मंदिर ते सिद्धेश्वर मंदिर असे करण्यात आले. भाविकासाठी महाप्रसाद म्हणून 200 किलोची खीर केली जात असे. त्या वेळी काइल साठी भरपूर प्रमाणात अडचणी येत होती अशी अडचण येत असताना रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी स्वखर्चाने महाप्रसादासाठी काइल देऊन सहकार्य केले.
अशाप्रकारे गेले 37 वर्ष सर्वांच्या सहकार्याने यात्रा भरविण्यात येत आहे. खरं म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन संपन्न होत असताना सर्व भाविक व जयसिंगपूरच्या नागरिकांना साहजिकच मनोभावे आनंद व उत्साह निर्माण झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा