Breaking

सोमवार, ३१ मार्च, २०२५

*कष्ट माणसाला जगवतात ; कौशल्य माणसाला श्रीमंत बनवतात : प्रेरक वक्ते प्रा.सुनील चौगुले*

 

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. सुनील चौगुले, प्रा.डॉ. राजेंद्र कोळी व अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. संदीप तापकीर 


*प्रा. विश्रांती चव्हाण : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : जागतिक स्पर्धात्मक पटलावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी कौशल्य विकास हाच महत्त्वाचा घटक आहे. युवकांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नवीन महत्त्वाची कौशल्य आत्मसात करून व्यावसायिक संधींना चालना मिळत असल्याचे मत प्रेरक वक्ते प्रा. सुनील चौगुले यांनी प्रतिपादन केले. 

      ते जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे अर्थशास्त्र पदव्युत्तर विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. संदीप तापकीर व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.

    प्रा. चौगुले पुढे म्हणाले, काळानुरूप बदलत्या परिस्थितीची भान ठेवून प्रत्येक व्यक्तीने नवीन प्रभावी कौशल्य आत्मसात करावीत. जेणेकरून यशस्वी जीवन व भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी प्रबल आत्मविश्वास वृद्धिगत होईल. 

       प्रथम सत्रात साधन व्यक्ती प्रा.डॉ. राजेंद्र कोळी म्हणाले, कौशल्य हे कोणत्याही जाती धर्माची मक्तेदारी नसून नवीन कौशल्य हे काही वेळेस स्मार्ट वर्क, अनुभवाची जोड व तीव्र इच्छाशक्तीच्या माध्यमातून साध्य होत असते.

    प्रा.डॉ.संदीप तापकीर अध्यक्षीय स्थानावर बोलताना म्हणाले, कष्ट व कौशल्य यामध्ये फरक असून कौशल्याच्या माध्यमातून आर्थिक व सर्वांगीण जीवनाचा मार्ग सुकर होत असतो. प्रभावी कौशल्य हेच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

    कु. करिष्मा ढाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. मेहबूब मुजावर यांनी केला.कु. ढोबळे यांनी आभार व्यक्त केले. कु.करीना ढाले यांनी सूत्रसंचालन केले.

    प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले..प्रा. व्ही.बी. देवकर,प्रा. विश्रांती चव्हाण,प्रा. ज्योती पोरे व विशेष करून एम.ए.च्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा